आगामी विधानसभेसाठी मनसेचा काय आहे प्लान; राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार आहे का?

Vidhan Sabha Election 2024

Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मनसेकडून काही विधानसभांच्या उमेदवारांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहे. वरळी विधानसभेतून मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय माहीममध्ये मनसेचे नेते नितीन सरदेसाई निवडणूक लढणार आहे. याशिवाय राजू पाटील कल्याण ग्रामीणमधून लढणार आहेत.

मनसे नेत्यांकडून या मतदारसंघात कामालाही सुरुवात झाली आहे. मनसे स्वबळावर लढणार की महायुती सोबत उमेदवारांना ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. विशेष म्हणजे वरळी मधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत.

Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024

दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी सुरू असल्याने विधानसभा एकत्र लढवणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. भाजपला महायुतीत असतानाही लोकसभा निवडणुकीत मोठा फटका सहन करावा लागला. सिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांना भाजपने सोबत घेतल्यामुळे अंतर्गत आणि भाजपच्या मतदारांमध्ये नाराजी पासल्याने म्हंटल जात आहे. जर महायुतीने एकत्रित निवडणूक लढवली तर विधानसभेच्या 277 जागा वाटप कस होणार याबाबत सवाल उपस्थित होतो. लोकसभेत शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये जागावाटपावरून झालेला वाद पाहता जर राज ठाकरेही युतीत सामील झाले तर विधानसभेतही जागावाटपाचा मुद्दा अधिक क्लिष्ट होऊ शकतो अस सांगितल जात आहे.

Vidhan Sabha Election 2024: कोणते नेते लढणार?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) मनसेने (MNS) तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर भूमिका स्पष्ट करताना त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना आपली सगळी ताकद विधानसभेच्या तयारीसाठी लावण्यास सांगितले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या काही निवडक पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश दिले आहेत. वरळी, माहीम,शिवडी, ठाणे, कल्याण ग्रामीणमध्ये त्यांनी उमेदवार हेरले असून त्यांनी या उमेदवारांना तयारीला लागण्यास सांगितले आहे.

युवा सेना प्रमुख आणि शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे हे वरळीमधून आमदार असून त्याच्या विरोधातही उमेदवार देण्याचे मनसेने ठरवले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने उमेदवार न् देण्याचा निर्णय घेतला होता. मनसेने या मतदारसंघातून आपल्या उमेदवारला कामाला लागण्याचे आदेश दिलेत, मात्र भविष्यात काय होईल हे सांगण अवघड आहे.

Vidhan Sabha Election 2024
Vidhan Sabha Election 2024

Vidhan Sabha Election 2024 वरळी विधानसभा मतदार संघातून मनसेचे संदीप देशपांडे यांना हिरवा कंदील दिला आहे. माहीम विधानसभा मतदार संघातून मनसेने नितीन सरदेसाई यांना तयारी करण्यास सांगितले आहे. ठाणे शहर मतदार संघातून मनसेने अविनाश जाधव यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहे. मनसेने त्यांनाही कामाला लागण्याचे आदेश दिलेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने एकूणने एकूण 288 पैकी 101 जागा लढल्या होत्या. त्यात फक्त एका जागेवर मानसेला यश मिळालं होत. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून गेले होते.

शिवसेनेने 288 पैकी 126 जागा लढल्या होत्या त्यात 56 जागांवर त्यांना यश मिळालं होत. भाजपने एकूण 288 पैकी 164 जागा लढल्या होत्या त्यातील 105 उमेदवारांना यश मिळालं होत. कॉँग्रेस एकूण 288 पैकी 147 जागा लढल्या होत्या आणि त्यांना 44 जागांवर यश मिळालं होत. राष्ट्रवादी कॉँग्रेसने एकूण 288 पैकी 121 जागा लढल्या होत्या आणि त्यांना 54 जागांवर यश मिळालं होत.

2019 ची परिस्थिति काय होती?

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप देशपांडे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी सिवसेनेच्या सदा सरवणकरांना कडवी लढत दिली होती. सदा सरवणकरांना 61337 मते मिळाली होती तर संदीप देशपांडे यांना 42690 मते मिळाली. ठाणे शहर मतदार संघातून अविनाश जाधव यांनी 2019 साली निवडणूक लढली होती. केळकर यांना 92298 मते मिळाली होती तर जाधव यांना 72874 मते मिळाली होती.

Vidhan Sabha Election 2024: मनसे 200 हून अधिक जागा लढणार

मनसे आगामी विधानसभा (Vidhan Sabha Election 2024) निवडणूक लढणार का? महायुतीसोबत मिळून लादणार का? मनसे जागांवर उमेदवार उभे करणार असे प्रश्न खुद्द मनसेच्या कार्यकर्त्यानाही पडले होते. या प्रश्नाची उत्तरे राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिली. त्यांनी सांगितले की काही जणांनी पुड्या सोडल्या आहेत, की मनसे महायुती कडे 20 जागा मागीतल्या आहेत. मनसे 20 जागा का मागणार? त्या आपल्याला कॉन देणार? असे सवाल करत राज ठाकरेंनी मनसे राज्यात 200 ते 225 जागा लढणार असल्याचे सांगितले.

वरळी, माहीम, शिवडीचे उमेदवार ठरले. मनसेने वरळीचे आमदार असलेल्या शिवसेना उबाठाच्या आदित्य ठाकरेविरोधात संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात निश्चित केले आहे. माहीममधून मनसे नितीन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात येणार आहे तर शिवडीमधून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. या नावांची मनसेने अधिकृत घोषणा केली नसली तर या तिघांना आपापल्या मतदारसंघात प्रचाराला लागण्यास सांगितले असल्याचे वृत आहे.

शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह काढून घेणे लोकांना आवडले नाही, राज ठाकरे आपल्या भाषणात बोलले!

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हंटले की, शिवसेनेतून 40 आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण डणुशबन चिन्ह आणि सिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकांना पटले नाही. लोकसभा निवडणुकीत निकलाबाबतही त्यांनी आपले मत पदधिकाऱ्यांना संबोधित करण्यासाठी केलेल्या भाषणत व्यक्त केले. महाराष्ट्रामद्धे महाविकास आघाडीला आणि खासकरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले आहे. पक्षफुटीनंतर शिवसेनेच्या कामगिरीकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. शिवसेना (उबाठा) च्या कांगिरीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही आश्चर्यचकित केले आहे.

महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अल्पसंख्याकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. राज ठाकरे यांनी हा मुद्दा आपल्या भाषणात उचलून धरत म्हंटले की, मराठी माणसाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही मात्र मुस्लिमांनी त्यांना मतदान केले. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच त्यांच्या पद्धतीने विश्लेषण करताना म्हंटले की महाविकास आघाडीला राज्यात झालेले मतदान हे महाविकास आघाडीवरील प्रेमामुळे झाले नसून मोदी यांना असलेल्या विरोधातून झाले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!