Maharashtra Politics
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवाय मोदी आणि शहानाही आव्हान देत डिवचले आहे. या पुढच्या काळात राजकारणात एक तर मी राहीन नाही तर, फडणवीस राहतील असा इशाराच त्यांनी दिला. रंगशारदा येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते. मला आणि आदित्यला जेलमध्ये टाकण्याचे षडयंत्र फडणवीसांनी रचले होते. आपण शांत बसलो, पण आता क्षण बसणार नाही. हे आव्हान मी त्यांना शिवसैनिकांच्या जोरावर देत आहे, असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. आदित्य तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते. हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Vs BJP) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध थेट ‘आर या पारची’ भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गत आणि भाजप मधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश कॉ दिशा दीखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरल होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकड करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदर हल्ला चढवला.

लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडले. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गाजलेली तलवार नाही, टर तळपटी तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्याची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.
Maharashtra Politics: फडणवीसांच राजकारण संपवायला ठाकरेना 100 जन्म घ्यावे लागतील: चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार
उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील् पक्षांच्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ललकारले होते. आता एक तर टू राहशीन नाहीतर मी राहीन, अशा भाषेत उद्धव यांनी फडणविसांना आव्हान दिले होते. या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या भाजप नेत्यांची फौज उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरक्ष: तुटून पडली. भाजपचे प्रेदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना तुम्हाला फडणविसांचं राजकारण संपवायला 100 जन्म घ्यावे लागतील, असे म्हंटले. आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडल. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजीना तुरुगात टाकू शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर तर टीका करण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रताही नाही. त्यामुळे घाम फोडण्याची त्याची भाषा हास्यपद आहे.
Maharashtra Politics: ‘एक तर तु तरी राहशील नाहीतर मी राहील’
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आता विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Politics) भाजपाची उरली सुरली गुरमीही उतरवू सगळं सहन करून मी उभा राहिलो. यापुढे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन, असंही आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले. याचा संदर्भ डेट अस्तानये म्हणाले, मला आणि आदित्य ठाकरेल अडचणीत आणण्याचे षडयंत्र कसे रचले गेले होते. हे अनिल देशमुख यांनी सांगितले आहेत. सगळं सहन करून मी हिंमतीनं उभा राहिलो आहे. त्यामुळे राजकारणात एकतर ते तरी राहतील किंवा मी राहीन, आज माझ्याकडे पक्ष चिन्ह, पैसा काहीच नाही. पण शिवसैनिकांच्या हिंमतीवर मी आव्हान देत आहे.
कर्णही अशीच भाषा बोलायचा, उद्धव ठाकरे लोकशाहीच्या लढाईत कौरवांच्या बाजूने: सुधीर मूनगंटिवार
महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असंच काहीस घडलंय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मूनगंटिवार यांनी दिली. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ति होते. बाळासाहेब ठाकरे कधीच कॉँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नव्हते. कॉँग्रेससोबत ज्या दिवशी जावं लागेल, त्यादिवशी मी माझ दुकान बंद करेन, असे त्यांनी म्हंटले होते. पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती, ती भूमिका उद्धवजीनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे. कर्ण ज्याप्रकारे अर्जुनला उद्देशून बोलायचा एकतर तू राहशीन किंवा मी राहीन, तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग हे आपण आता लोकशाहीच्या युद्धात पाहतोय.
कोणीही कोणाला धडा शिकवण्याची भाषा करू नये. रावणाने भाषा केली, कंसाने भाषा केली, जेव्हा जेव्हा अशी भाषा केली जाते, आपण शकुणीसारख्या लोकांच्या नदी लागतो, तेव्हा आपण कीती शक्तिशाली असलो तरी अपयशच वाट्याला येते, असे भाजप नेते सुधीर मूनगंटिवार यांनी म्हंटले.
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरेंची लाज वाटतेय: केशव उपाध्ये
महाराष्ट्रातील (Maharashtra Politics) जनतेला उद्धव ठाकरे आज तुमची लाज वाटते. महाराष्ट्रारात समृद्ध परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे असतील शरद पवार आहेत बाकी अन्य नेते आहेत. गोपीनाथ मुंढे, प्रमोद महाजन अशी मोठी परंपरा आहे. हे एकमेकांचे विरोधक होते मतभेद होते मात्र कोणीही कोणत्या नेत्यांनी एकमेकांना संपवण्याची भाषा केली नाही. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तुम्ही मुख्यमंत्री होतात असा मुख्यमंत्री जो कधी मंत्रालयात गेला नाही ज्याने जनहिताचे काम केले नाहीत. टु काळही आम्ही बघितला. तुमच्या पासून कार्यकर्ते आमदार जनता गेली. मात्र त्याचा दोष तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना देताय.
मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यावरही कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र ते झालं नाही कर्ण सत्य हे सत्य असते. ही भाषा एका माजी मुख्यमंत्र्याला शोभणारी नाही. तुम्हाला लोकांनी कधी स्वीकारलं नाही तरीही तुम्ही मुख्यमंत्री झालात. येत्या काळात जनता ठरवणार आहे. कोणाला त्या पदावर बसवायचं. तुमच्या या सूडबुद्धीच्या विधानाने जनतेला मात्र लाज वाटते, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हंटले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!